रविवार, १२ डिसेंबर, २०१०

जन पळभरही "हाय हाय" नाही म्हणाले....

आयुष्यभर आम्ही स्वत:ला कोणी
मोठे समजत होतो
मेल्यावर कळले आम्हाला
आम्ही वेडी स्वप्ने रंगवीत होतो
त्यावेळी रस्त्यावर आम्ही
आपले बॅनर डकवित होतो
आम्ही कोणीतरी मोठे
असे जगास भासवीत होतो
मेल्यावर कळले आम्हाला
आम्ही जगास फसवीत होतो
मेल्यावर आम्हा वाटले
जनसागर उसळेल तेथे
गर्दी बघुन सारी
आम्ही कफनात रडत होतो
आम्ही मेल्यावर
जन पळभरही "हाय हाय" नाही म्हणाले
माझॆ मलाच आठवेना
जीवंतपणी आम्ही कार्य तरी काय केले ????

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा