मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

धन्य ते सावकार आणि धन्य ते सरकार...

शेतक-यांच्या आत्महत्याला कॉग्रेसच जबाबदार असुन त्यासंबधी दंड करुन न्यायालयाले सरकारला  फटकारले त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्यांचा मुद्दा परत चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रात विषेशकरुन विदर्भात हजारो शेतक-यांनी कर्जबाजारीपणाला व सावकारी अत्याचाराला कंटाळुन आत्महत्या केल्या,  विरोधी पक्षांनी, मीडीयाने याप्रश्नी रान उठवले, सरकारने त्यावर मात्र त्यावर काही खास उपाययोजेना केल्याचे दिसुन आले नाही, महाराष्ट्राच्या तात्कालीन गृहमंत्र्यांनी सावकारांना फोडुन काढा असे फर्मान काढले खरे परंतु त्याच्यांच सरकारने (तात्कालीन मुखमंत्र्यांनी) सावकारांना पाठीशी घालण्याचे पाप केले, आ.सानंदा यांच्याविरुध्द सावकारी अत्याचाराची एका शेतक-याने दाखल केलेली तक्रार दाखल करुन घेवु नका अथवा त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करु नका असा फोनच संबधीत पोलीसस्टेशन ला त्यावेळी मुखमंत्र्यांनी लावला, मात्र न्यायालयाने या संदर्भात सरकारला चांगलेच फटकारले असुन सरकारला या प्रकरणी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यानिमीत्ताने जनतेसमोर कॉग्रेसी सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. सावकारांना पाठीशी घालुन शेतक-यांना आत्महत्या करायला लावणा-या सरकारचे काय करावे असा प्रश्न जनतेला पडल्यास सावकारांनाच काय सरकारलाही फोडुन काढा असे फर्मान आता काढावे लागेल पण या मांजरांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? सरकारला १० लाख रुपयांचा दंड झाला खरा, परंतु त्या संबधीत शेतक-याची त्या आमदार सावकाराकडे असलेली जमीन त्याला परत कधी मिळणार याचे उत्तर कोणाकडॆच नाही, खरच सरकारने अशा सावकारी प्रवृत्तींना पाठीशी घालुन शेतक-यांच्या आत्महत्याच्या पापाचे धनी होवु नये, कारण महाराष्ट्राला हे नेते कधीच वाचवु शकणार नाहीत, शेतकरीच महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवु शकतो. मात्र आवर्जुन म्हणावेसे वाटते खरच धन्य ते सावकार आणि धन्य ते त्यांना पाठीशी घालणारे सरकार...   

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

जन पळभरही "हाय हाय" नाही म्हणाले....

आयुष्यभर आम्ही स्वत:ला कोणी
मोठे समजत होतो
मेल्यावर कळले आम्हाला
आम्ही वेडी स्वप्ने रंगवीत होतो
त्यावेळी रस्त्यावर आम्ही
आपले बॅनर डकवित होतो
आम्ही कोणीतरी मोठे
असे जगास भासवीत होतो
मेल्यावर कळले आम्हाला
आम्ही जगास फसवीत होतो
मेल्यावर आम्हा वाटले
जनसागर उसळेल तेथे
गर्दी बघुन सारी
आम्ही कफनात रडत होतो
आम्ही मेल्यावर
जन पळभरही "हाय हाय" नाही म्हणाले
माझॆ मलाच आठवेना
जीवंतपणी आम्ही कार्य तरी काय केले ????

कॉग्रेसचा हा "निरा" उद्योग

कॉगेस ची गाडी बाई हाकतात
अशा कथा सर्वच सांगतात
पण "निरा राडीया" तर म्हणे
कॉग्रेसच्या राजकारणाचे
"उद्योग" पण सांभाळतात
राडीयांची उठ्बस टाटा-बिर्लां पासुन
सचिव, मंत्री अगदी राजा सोबत असते
राजकारणातुन कोणाला उठ्वायचे
आणि मंत्रीपदावर कोणाला बसवायचे
हे "बाईंनी" नाही तर
निरा राडीयांनी ठरवायचे असते
कॉग्रेसचा हा "निरा" उद्योग
टॅपींग ने उघड केला
टाटा कॉगेसचे प्रवक्ते तर
राडीया नवे सत्ताकेंद्र
हा नवा बदल मात्र आम्ही सर्वांनीच पाहीला..

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

....................ही लोकशाही आहे ?

देशात लाखो लोक बेघर
हजारो फुटपाथवर राहतात
चढतात नेत्यांचे मजल्यावर मजले
वर फ्लॅटचे घोटाळे होतात
मग सांगा बरं कशी म्हणता
....................ही लोकशाही आहे ?
आम्ही नेत्यांना निवडुन देतो
ते सोईने पक्षांतर करतात
विरोधी पक्षातले नेते सुध्दा
तडजोडीचे राजकारण करतात
मग सांगा बरं कशी म्हणता
..................ही लोकशाही आहे ?
संसदेत आमचे खासदार
कामापेक्षा गोंधळच करतात
नवे घोटाळे दडपण्यासाठी
जुन्याचे हिशोब मागतात
मग सांगा बरं कशी म्हणता
..................ही लोकशाही आहे ?
लोकांसाठी असलेले लोकांचे राज्य
ही लोकशाहीची कल्पना
आता जुनी झाली
नेत्यांनी त्यांच्याच साठी
चावुन चावुन खाल्लेले
नेत्यांचेच राज्य ही कल्पना
आता सर्वार्थानी रुढ झाली
मग सांगा बरं कशी म्हणता
....................ही लोकशाही आहे ?

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

वाराणशीतला बॉम्बस्फोट आणि राजकारण..

२६/११ च्या शहिदांना श्रध्दांजली वाहुन १० दिवस ही पुर्ण झाले नाहीत की दहशतवाद्यांनी परत एकदा वाराणशीत बॉम्बस्फोट घडवुन आणला आणि सरकारी यंत्रणेबरोबरच नागरीकांचीही झोप उडवली. वाराणशीतल्या बॉम्बस्फोटाने एका निश्पाप लहान मुलीला आपले प्राण गमवावे लागले, अनेक नागरीक गंभीर जखमी झाले २६/११ जखम परत ताजी झाली. या दहशतवादाचा संपुर्ण भारतीयांनी मिळून प्रतीकार करायला पाहीजे परंतू यामध्ये आता नविनच राजकारण सुरु झाले आहे. केंद्र सरकार चे गृहखाते आम्ही अशा प्रकारचा हल्ला होवु शकतो सतर्क रहा अशी सुचना उत्तरप्रदेश सरकारला दिली होती परंतू त्यांनी गांभीर्याने घेतले नाही असा आरोप करीत आहे तर मायावतींनी असा कोणताही ईशारा देण्यात आला नव्ह्ता असा पवित्रा घेतला आहे. वास्तवीक पाहता यामध्ये दोघेही दोशी आहेत केंद्र सरकार भित्रे आणि पळपुटे असुन मायावतींनाही या घटनेचे गांभीर्य नाही. प्रत्येक राज्याकडे स्वत:ची सुरक्षा यंत्रणा आहे त्यांनी त्याचा पुरेपुर वापर करुन अशा घटना थांबवायला पाहीजेत, परंतु पोलीसांना सध्या अनेक राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेत गुंतुन राहावे लागते त्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसावा. आपल्या देशातील नागरीकांचे हे दुर्दॆव म्हणावे लागेल की त्यांच्या सुरक्षेची ना केंद्र सरकारला काळजी आहे ना राज्यसरकारला त्यामुळे जनता दोघांनीही वा-यावर सोडली आहे.     
सरकार "कसाब" व "अफजल गुरु" या जावय़ांना का पोसत आहे ?
केंद्र सरकार भित्रे आणि पुळचट आहे अशी जनभावना आहे. भारताच्या संसदेवर आणि मुंबई वर दहशतवादी हल्ला करणा-या अतिरेक्यांना शिक्षा होवुनही सरकार घरजावयासारखे का पोसत आहे हा भारतातील तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे, कारण त्यां दहशतवाद्यांना वेळेवर फासावर लटकवले असते तर अतिरेक्यांची हिंमत कमी झाली असती, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारतात लोकशाही परीपक्व आणि लोकशाहीची मुल्य जपणारी आहे हे सिध्द झाले आहे, या हल्ल्यांचे पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठेवलेले आहेत तरी आता त्यांना झालेली शिक्षा ठोठावण्यात कोण आडवे येत आहे. यामुळे मात्र दहशतवाद्यांची हिंमत दिवसोंदिवस वाढते आहे. भारत सरकारने आपले भित्रे आणि पुळचट धोरण सोडुन दहशतवादावर कडक उपाययोजना केल्याशिवाय हे थांबणारे नाही, आणि आपासतात एकमेकांवर आरोप करुन राजकारण करण्यापेक्षा दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करावा हीच जनतेची अपेक्षा आहे.

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

"विकीलीक्स" च्या ज्युलीयन असांजने अमेरीकेला नाचवले...

विकीलीक्स या जगभर गाजत असलेल्या वेबसाईटचा संस्थापक ज्युलीयन असांज ने सध्या अमेरीकेची झोप उडवली आहे. २००६ मध्ये असांज ने विकीलीक्स ची स्थापना केली, आज ती जगभरात लोकप्रीय झालेली आहे.  जगभरातील विवीध देशांची गोपनीय कागदपत्रांना प्रसीध्दी देवुन खळबळ उडवुन देणा-या विकीलीक्स ने सत्ताधा-यांची झोप उडवली आहे. नुकताच अमेरीकेने भारताला आंतरराष्ट्रीय सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठींबा दर्शवीला होता परंतु विकीलीक्स ने अमेरीकेचा हा दावा कसा खोटा आहे याची गोपनीय कागदपत्रे प्रसीध्द केली आहेत. जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणा-या अमिरीकेला ज्युलीयन असांजने अक्षरश: नाचवले आहे, प्रसीध्द होणा-या गोपनीय कागपत्रांबद्द्ल खुलासे करत जगभर फिरण्याची वेळ ज्युलीयन असांजने अमेरीकेवर आणली आहे. ज्युलीयन असांजला मदत करणारे यंत्रणा ही कार्यरत आहे, त्याला जगभरातुन ही गोपनीय माहीती अशाच मदतगारांकडुन प्राप्त होते,  विकीलीक्स च्या दाव्यानुसार त्यांच्याकडे अशी १० लाख गुप्त आणी स्फोटक कागदपत्रे आहेत आणि त्यांना प्रेसीध्दी मिळाल्यानंतर जगभरात खळबळ माजेल यात शंका नाही.
    विकीलीक्स ने जगभारात अमेरीकेची नाचक्की केली आहे. आपणच जगाचा राजा असल्याचा टेंभा मिरवना-या अमेरीकेचा बुरखा त्यांनी टराटरा फाडला आहे. भविष्यात अमेरीकेचा काळा चेहरा विकीलीक्स जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही येवढे मात्र निश्चीत. त्या ज्युलीयन असांजला खरच मानाचा मुजरा... 

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

सरकार आणि त्यांचे अधिकारीच खरे गांधीवादी...

रस्त्यावरचे खड्डे पाहुन आम्ही
त्या खड्ड्यात झाडे लावतो
बांधकाम खात्याला त्याचे सोयरसुतक नसते
ती आमची गांधीगिरी....
रोज रोज चकरा मारुनही
ऑफीसात साहेच भेटत नाहीत
तेव्हा आम्ही त्यांच्या
खुर्चीला हार घालतो
ती आमची गांधीगिरी....
विज सारखी ये-जा करते
घंटाभरही टिकत नाही
एमीसीबी चे साहेच काहीच करीत नाहीत
आम्ही त्यांना प्रकाशासाठी कंदील भेट देतो
ती आमची गांधीगिरी....
सरकार असो वा सरकारी कार्यालय
आमचे कुठेच काही चालत नाही
आम्ही आतल्या आत जळत राहतो
मनातल्या मनात निषेध करतो
सारं सहन करण्याची आम्हाला सवय होते
शेवटी आमच्या लक्षात येतं
सरकार आणि सरकारचे अधिकारीच
खरे गांधीवादी
कारण तेच अनुकरण करतात
गांधीजींच्या तिन माकडांचे
जनतेच गा-हाणं ऐकू नका..
लोकांच्या तक्रारीकडे पाहु नका
आणि काही झालं तरी
याबाबत कुठे काहीच बोलु नका...

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

मला हसावे की रडावे हेच कळत नाही ?

स्व्प्नात आपले राज्य दान करणारा राजा हरीश्चंद्र
आणि रोज नवनवे भुखंड हडप करणारे सत्तेतील चंद्र
यांची तुलना केली की मला
हसावे की रडावे  हेच कळत नाही ?
राज्यातील जनतेची दैन्यावस्था पाहुन
सत्तेचा त्याग करणारा सम्राट अशोक
आणि जनतेला वा-यावर सोडून
घोटाळ्यावर घोटाळे करणारा सध्याचा अशोक
यांची तुलना केली की मला
हसावे की रडावे  हेच कळत नाही ?
देशाचे हजारो कोटी खावुन राजीनामा देणार नाही
असे म्हणनारा टेलीकॉमचा राजा
आणि वडीलांच्या आज्ञेखातर राज्याचा त्याग करुन
वनवासात जाणारा आयोध्येचा राजा
यांची तुलना केली की मला
हसावे की रडावे  हेच कळत नाही ?
सध्याचे राज्यकर्ते आणि ईंग्रज राज्यकर्ते
यांची तुलना करताना मात्र मला बरे वाटते
कारण लोक म्हणतात
ईंग्रज जुलमी होते, भारतीयांना खुप लुबाडले
आपण पारतंत्र्यात होतो,लोकांचा आवाज त्यांनी दडपला
लोकांचे हे म्हणने
मात्र मला खरे वाटते......
                                                                       अमोल देशमुख,माजलगांव (बीड)

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

व्यथा...

प्रेमाची अशी का
ही शिक्षा मिळावी
पहील्याच पावसात अशी
व्यथा घडावी
हात पसरावा
पहिल्या थेंबासाठी
अन हाती विज पडावी..
.................................................संकलीत
(ही कविता कोणाची आहे हे माहीत नाही सहज वाचनात आली, मनाला भावली म्हणुन प्रकाशीत करत आहे.)

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

बहुचर्चीत "जे.पी,सी."

जेपीसी च्या मागणीवर
विरोधकांनी रान उठवले
कॉग्रेसने ती नाकारुन
विरोधकांना चांगलेच ठकवले
पन्नास कोटी पाण्यात गेले तरी
सरकार मुग गिळून गप्प आहे
घोटाळ्याच्या चौकशीसाठी मात्र
लोकसभेचे कामकाज ठप्प आहे

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०

घराणेशाही

आता सगळीकडेच शिरली
लायकीपेक्षा नातीच मग
महत्वाची ठरली
डॉक्टर चा मुलगा
डॉक्टर होतो
शिक्षकाचा शिक्षक
मग आम्हीच का करु नये
अशी पुस्तीही त्यांनी जोडली
दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
सर्वच पक्षात घराणेशाही मुरली आहे
राजकारणातील ही गोष्ट नवी नाही
महाभारतातील ध्रुतराष्ट्रापासुनच
ती राजकारणात शिरली आहे...

......................अमोल देशमुख

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

पुरावे गहाळ करण्याचा कॉग्रेसी अजेंडा..

आदर्श चे तर आता
पुरावेच गहाळ केले
नवे गडी नवे "राज" आले तरी
तरी पहीलेच पाढे पंचावन्न झाले
पुरावेच नाहीत तर हे
चौकशी कशाची करतील
घोटाळेबाज नेते तर आता
उजळ माथ्याने फिरतील 
पुरावेच गहाळ करण्याचा
हा नविन फंडा आहे
पोटभर खावून ढेकर देण्याचा
हा तर भ्रष्ट कॉग्रेसी अजेंडा आहे.

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०१०

हे चिमन्यांनो परत फिरा रे घरकडे आपुल्या.........

जीवापलीकडे जपलेल्या पाखराला
उडण्यास आईवडीलच शिकवतात
पण दुरदेशी गेलेली चिमणी पाखरं
घरट्याकड कशाची परत फिरतात
त्यांचे नवे जग नव्या दुनीयेत
वृध्द आईवडीलांना स्थान नाही
ते बीचारे त्यांच्या वाटेकडे
डोळे लावुन बसतात
याचेही त्यां पाखरांना भान नाही...
(आज अशा खुप वृध्द आईवडीलांना हा अनुभव येत आहे त्यांची मुले परदेशी गेलेले असोत की या देशातच इतरत्र असोत किंबहुना त्याच गावात रहात असोत पण त्यांना वृध्द आईवडीलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, ते आपल्याच हम दो हमारे दो अशा दुनीयेत मग्न असतात त्या अभागी वृध्द आईवडीलांसाठी सुचलेल्या वरील चार ओळी)

..................अमोल देशमुख,माजलागांव(बीड)

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

राज ठाकरेंचा मुद्दा किती खरा होता..

महाराष्ट्रात रोजगार शोधण्यापेक्षा
बिहारमध्येच रोजगारनिर्मीती करा
हा राज ठाकरेंचा मुद्दा बरा होता
नितीषकुमारांनी काम केले
बिहार जिंकले तेव्हा लालूंना कळले
हा मुद्दा किती खरा होता

निकाल पाहुन लालूंचे पाय
आता तरी जमीनीवर येतील
दंडुकेशाही करुन सत्ता मिळ्त नाही
हे कळल्यावर
आता तरी ते समाजसेवेकडे वळतील

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

बिहारमध्ये राजपुत्र राहुल निष्प्रभ...

बिहार निवड्णूकांचे निकाल जाहीर झाले आणि बिहार मध्ये क्रांतीचे नवे पर्व सुरु झाले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवत इतिहास निर्माण केला. नितीशकुमार यांनी कॉग्रेस,राजद,लोजप यांना चारीमुंड्या चित केले. कॉग्रेसने बिहार निवड्णूकांसाठी राजपुत्र राहुल गांधी यांना प्रचारात उतरवले होते, त्यांचा करीष्मा चालेल आणि नितीशकुमार पायउतार होतील असा त्यांना विश्वास होता परंतु नितीशकुमारांची जादु अशी चालली की कॉग्रेसला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, कॉग्रेसपेक्षा अपक्षांना जास्त जागा मिळाल्या बिहारमध्ये कॉग्रेस साफ झाली. कॉग्रेस हायकमांड ला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
    बिहारची लालुप्रसाद यादव, साधु यादव, वगैरे दादा मंडळींनी देशभरात जी वाईट प्रतीमा निर्माण केली होती ती थोड्या प्रमाणात का होइना पुसण्यात नितीशकुमार यशस्वी झाले. मागील पन्नास वर्षात बिहारमध्ये काहीच विकास झाला नव्हता, रस्ते, विज, पाणी या मुलभुत गरजा ही पुर्ण करणे पुर्वीच्या कॉग्रेस,राजद,लोजप यांना जमले नव्हते, ते काम काही प्रमाणात का होईना मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात नितीशकुमारांनी करुन दाखवले, अपहरण, खुन, खंडणी ही बिहारमध्ये फार मोठी समस्या होती, बिहारमध्ये सुर्यास्तानंतर हातात बंदुक घेतल्याशिवाय घराबाहेर पडणे अशक्य होते, नितीशकुमारांच्या सरकारने अपहरण, खुन, खंडणी हे प्रकार जवळपास बंद केले, बिहार मध्ये आजपर्यंत फक्त जातीय समीकरणाच्या आधारेच सरकार अस्तीत्वात येत होते, परंतू या वेळेला बिहारच्या जनतेने जातीच्या पुढे जावुन विकासाला मत दिले, महीला आरक्षणामुळे महीलावर्गानेही मोठ्या प्रमाणावर नितीशकुमारांना मत दिले, या सर्वे बाबींमुळे बिहारमध्ये विकासाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,बिहारमधुन रोजगाराच्या शोधात देशाच्या सर्व भागात जाणारा बिहारी बाबू तेथेच थांबेल, विषेशकरुन बिहारमधुन महाराष्ट्रात येणारे बेकारांचे लोंढे थांबतील हाच नितीशकुमार आणि भा.ज.प. च्या विजयाचा अर्थ लावता येईल, मात्र या निवडणुकांमुळे बिहारमध्ये क्रांती झाली..साधु-लालूची गच्छंती झाली.. एवढे मात्र निश्चीत.

सोनीयांही एक दिवस "जय महाराष्ट्र" म्हणतील.

मी मराठीतच बोलणार म्हणत
नव्या मुख्यमंत्र्यांनी आपला
मराठी बाणा दाखवला
मराठीजनांनी मात्र
हिंदीवाल्यांना खडे बोल सुनावनारा
पहीलाच मुख्यमंत्री बघीतला
हिंदी चॅनल वाले आता
मराठीच्या वर्गालाही येतील
मुख्यमंत्र्यांसमोर तरी
मराठीचे बोल बोलतील
मराठी नेत्यांनी असाच
मराठी बाणा जपला तर
सोनीयांही एक दिवस
"जय महाराष्ट्र" म्हणतील.

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

टू जी स्पेक्ट्र्म काय आहे ?

टू जी स्पेक्ट्र्म काय आहे
एका घोटाळ्याचं नाव आहे
घोटाळ्यांच्या देशात
राजानेच वसवलेल
एक छोटस गांव आहे
जनतेच्या कल्पनेपलीकडे असणारा
हा घोटाळा किती महान आहे
सत्यम च्या राजूचा
हर्शद च्या शेअरचा
मुंबईतील आदर्श चा
तेलगीच्या मुद्रांकाचा
अन ईटलीच्या बोफोर्स चा
घोटाळा तसा खुपच लहान आहे.

घोटाळेबाज नेते काय काय करतील ?

नेत्यांचे फ्लॅटचे घोटाळे पाहुन
निराश झालेला माझा एक मित्र म्हणाला
वाटलं तर आपण फुटपाथवर राहु
पण आपली घरे आपण या नेत्यांना देवु
या नेत्यांच पोट यानं तरी
भरतं का ते पाहु
मी त्याला म्हणालो
तस काही करु नको बाबा
तु घर देशील
तर ते तुझ शेत मागतील
तु शेत देशील
तर ते तुझ सोनं नाणं मागतील
हे सारं विकुन आलेला पैसा
स्वीस बॅंकेत भरतील
आणि आपण फुटपाथवर रहायला गेल्यावर
ते तेथे राहण्यासाठी परत टोल सुध्दा मागतील
पुढे तर...
आपल्याला मुक्त श्वास घ्यायला सुध्दा
टोल द्यावा लागेल
कारण त्यातही भरपुर पैसा आहे म्हणुन
ते या हवेचाही
खाजगी टेंडर काढून जाहीर लिलाव करतील..

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०

सल्लुमियाचा बालीशपणा..

२६/११ चा मुंबई वरील दहशदवादी हल्ला हा श्रीमंतांवर झालेला हल्ला होता म्हणुन त्याचा अधिक बोलबाला झाला, त्या अतिरेकी हल्ल्यात शेजारच्या देशाचा हात नव्हता अशी मुक्ताफळे सल्लुमियाने उधळली,  बालीश वक्तव्ये करुन प्रसिध्दी मिळवण्याचा स्टंट सल्लुमियाच्या चांगलाच अंगलट आला, अशी विधाने करुन त्याला काय साधायचे होते हे त्याचे त्यालाच माहीत. कदाचित वादग्रस्त विधान करुन चर्चेत येवुन त्याच्या दबंग ला प्रसीध्दी मिळवुन देण्याचा त्याचा प्रयत्न असावा, तसे असेल तर तो प्रयत्न फसला असेच म्हणावे लागेल.
    मुंबई मध्ये ताज,ओबेराय वर हल्ला झाला तेथे फक्त श्रीमंताचेच वास्तव्य असते असे त्याचे म्हणने होते परंतु त्याचवेळी जे.जे. हॉस्पीटल, कामा हॉस्पीटल, सी.एस.टी. येथेही दहशदवाद्यांनी हल्ला करुन मोठ्या संख्येने निश्पाप नागरिकांना मारले हे सल्लुमिया विसरला आणि बेलगाम वक्तव्य करुन गेला. असे विधान करुन सलमान खान ने मात्र आपले हसे करुन घेतले. सरकारने त्याच्या या वक्तव्याची गांर्भीयाने दखल घेवुन त्याला फटकारायला हवे होते, परंतु सलमानवर ताबडतोब सर्वबाजुंनी टीका झाल्यावर त्याने माफी मागुन या वादातुन आपली सुटका करुन घेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. काही दिवंसांपुर्वी सलमानने आपल्या गाडीखाली फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांना चिरडले होते ते गरीबच होते, त्यावेळी त्याने आपण सेलेब्रीटी असल्यामुळेच या प्रकरणाला जास्त प्रसीध्दी देण्यात आली असा कांगावा केला होता. सलमान खान ने यापुढेतरी अशी बेलगाम वक्तव्ये करु नयेत अशीच सर्वांची अपेक्षा असणार..
     

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

मातृदिनानिमीत्त....

शिंपल्यात पाणी घालुन
समुद्र दाखवता येत नाही
हाताने काढलेल्या फुलाला
सुगंध येवु शकत नाही
निळ्याभोर गगनाचा
अंत काही होत नाही
अन
आईच प्रेम
शब्दात व्यक्त होत नाही....

मातृदिनानिमीत्त हार्दिक शुभेच्छा...